file photo 
छत्रपती संभाजीनगर

दीड महिन्यात वीस कोटीच्या नियोजनाचे आव्हान

मधुकर कांबळे

औरंगाबाद - आर्थिक वर्ष संपायला ३५ - ३६ दिवस बाकी आहेत. असे असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास ५०५४ व ३०५४ अंतर्गत २५ कोटींची रक्कम अद्याप अखर्चित आहे. 

हा निधी मार्चअखेर परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम व अर्थ विभागातून २८ फेब्रुवारीपर्यंत २० कोटींच्या कामाचे नियोजन करुन कार्यारंभ आदेश द्यावेत, असे आदेश बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिले.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सोमवारी (ता.२४) बैठक झाली. सदस्य कलीम कोदन, अक्षय जायभाये, शुभांगी काजे, नीता राजपूत, शिल्पा कापसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मांगुळकर उपस्थित होते.

 बैठकीत बांधकाम विभागाच्या निधी व कामांचा आढावा घेण्यात आला. रस्ते, पूल बांधकामासाठी असलेल्या ५०५४ लेखाशीर्षांतर्गत २१ कोटी तर ३०५४ अंतर्गत चार कोटी रुपये अखर्चित असल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम जर मार्च अखेरपर्यंत खर्च झाली नाही तर निधी सरकार दरबारी परत जातो. 

दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या रकमेचे नियोजन झाले नसल्याचे समोर आले. पुढच्या दीड महिन्यात या निधीचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सभापती बलांडे यांनी बांधकाम व अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित केले की २८ फेब्रुवारीपर्यंत २० कोटींच्या कामांचे नियोजन झाले पाहिजे. 

निविदा प्रक्रियेपासून कार्यारंभ आदेशापर्यंतचे टप्पे लवकर पार पाडावेत, तांत्रिक त्रुटी काढत बसण्यापेक्षा त्या कशा सुटतील यावर भर द्यावा. फायलींचा प्रवास कमी करावा, आदी सूचना त्यांनी केल्या. केवळ नियोजन नव्हे तर त्याची अंमलबजावणी पूर्ण करुन सर्व कामांची सुरवात वेळेत झालीच पाहिजे, असे सभापती श्री. बलांडे यांनी आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT